Wednesday, October 06, 2021

नागरिकशास्त्रातील कर्तव्य हरवत आहे कां? – अपूर्ण

 

नागरिकशास्त्रातील कर्तव्य हरवत आहे कां?

अपूर्ण – त्या डायरीची पाने शोधणे १० मे २००७ (बहुधा)

सुमारे पन्नास वर्षापूर्वी भौतिकशास्त्र शिकत असताना त्यातला एक धडा माझी खूप फेव्हरिट होता- एनट्रॉपी या विषयावरचा. त्या धड्याचे सार असे की बाहेरून कांहीही मदत किंवा ढवळाढवळ नसेल तर कोणत्याही सिस्टम मधे एनट्रॉपी अर्थात् अव्यवस्था वाढत जाते आणि त्या सिस्टममार्फत वापरली जाऊ शकणारी उर्जा घेणे हे अधिकाधिक कठिण होत जाते. म्हणजे त्या सिस्टम मधे उर्जा नसते असे नाही- उर्जा असणारच कारण ऊर्जेचा नाश होऊ शकत नाही. मात्र ती सहजासहजी वापरली जाऊ शकणारी उर्जा रहात नाही. ती ऊर्जा वापरण्यासाठी अधिक काम करावे लागते किंवा बाहेरून काम करावे लागते.

कांही वर्षांनंतर हाच नियम पुनः ऐकायला मिळाला तो जीवशास्त्रज्ञांकडून. सजीव आणि निर्जीवाची व्याख्या कशी करायची आणि त्यांची भिन्नता कशावरून ओळखायची हा प्रश्न जीवशास्त्रज्ञांना खूप वर्ष छळत होता. त्यांना एनट्रॉपीच्या धडयात हे उत्तर सापडल. बाहेरील ढवळाढवळ नसताना ज्या सिस्टम मधील एनट्रॉपी किंवा अव्यवस्था वाढत जाईल ती निर्जीव सिस्टम. मात्र ज्या सिस्टम मधील व्यवस्था टिकून रहात असेल ती सजीव सिस्टम- कारण सजीवता असेल तरच ती सिस्टम स्वयंस्फूर्तीने अव्यवस्था थांबवू शकेल. अशी स्वयंप्रेरणा- ज्याला जीवशास्त्राच्या भाषेत इंटेलिजेंस म्हणतात- ती फक्त सजीव प्राण्यांमधेच असू शकते. आणि निर्जीवापासून सजीवाला वेगळे ओळखण्याची तीच खूण ठरते.

मधे अजून कांही वर्ष गेली आणि पुनः एकदा एनट्रॉपीच्या धडा वाचायला मिळाला- यावेळी समाज शास्त्राच्या पुस्तकांत. कांही समाज हजारो वर्ष टिकले. आणि कांही समाज कालौघात नष्ट झाले. याचे कांय कारण असावे? कोणते समाज टिकतात आणि कोणते नष्ट होतात? जे समाज टिकेल त्यांच्या मधे अस कांय होतं की ज्यामुळे ते टिकू शकले? उत्तर एनट्रॉपी- समाजाची एनट्रॉपी ! ज्या समाजांमधे अव्यवस्था वाढत गेली, समाजोपयोगी ऊर्जा वापरून समाजाला पुढे नेण्याची प्रक्रिया होऊ शकली नाही- तशी स्वयंप्रेरणा समाजाच्या घटकांमधे उरली नाही- ते समाज निर्जीव ठरले आणि कालांतराने नष्ट झाले. ज्या समाजांमधे अशी स्वयंप्रेरणा दिसून आली- व्यवस्था सुधारणेचा वसा घेणारे निपजत गेले, तिथे अव्यवस्थेला वेळीच आळा घेतला गेला आणि ते समाज जिवन्त राहिले, टिकून राहिले.

मला उगीचच कवि इकवाल यांचे गीत आठवले- यूनान, मिस्र रूमा, सब मिट गये जहाँ से, कुछ बात है कि हस्ती- मिटती नही हमारी... सारे जहाँ से अच्छा हिंदोस्तां हमारा...

आणि वाटल- ठीक आहे, आतापर्यंत आपला समाज टिकला, पण पुढे कांय? ती जी स्वयंप्रेरणा एका जिवन्त समाजाला आधारभूत आहे ती आज कुठे दिसते कां? भविष्यकाळांत रहाणार आहे कां? ती यावी (आणि टिकाऊ- चिरंतन स्वरूपाने यावी) यासाठी कांही प्लान करता येते कां- कांही प्रयत्न होऊ शकतात कां? याचे उत्तर मिळण्यासाठी आजूबाजूला एक नजर टाकावी लागेल- आज कुठे कुठे, काय आणि कस घडतय? त्याच प्रमाणे स्वातंत्र्यानंतरच्या साठ पासष्ट वर्षांच्या इतिहासाचा पण मागोवा घ्यावा लागेल.

स्वातंत्र्यानंतर सहा दशकं उलटली. या काळांत समाजाची कर्तव्यभावना कशी कशी बदलली? पहिल्या दशकांत ज्यांचे वय वीस ते पन्नासात होते त्यांच्याकडे नवीन आशा आणि उमेद होती तसेच एक हुश्श... ची भावना पण होती. चला आता स्वातंत्र्य मिळालेले आहे, एक मोठा टप्पा पार पडला आहे- आता सर्व सुरळित होईल- कुणीतरी करेल- मीच केल पाहिजे अस नाही. त्यामुळे खूप ध्येयवादी आणि हुश्शवादी अशी समाजाची विभागणी झाली. पहिल्या प्रकारच्या लोकांनी ध्येयवादाने कांही चांगल्या संस्था, चांगले पायंडे निर्माण केले तर दुसऱ्या प्रकारची माणसे स्वकेंद्रित होऊ लागली. औद्योगिक वाढ, शिक्षण, विज्ञान, शोधकार्य करणाऱ्या नवनवीन संस्था, हरित-क्रांती, नियोजनाद्वारे विकास, सिंचन, रस्ते, दळणवळण, स्वास्थ्य सुरक्षा, महिला-विकास इत्यादी क्षेत्रांत चांगल्या कामांची धडाकेबाज सुरवात झाली. मग तीन मोठी युद्ध झाली. त्या काळांत पुनः देशभर ढवळून निघाला. हुश्शवादी मंडळीतही हालचाल झाली. देश एकत्र उभा असल्याचे चित्र दिसून आले.

त्या नंतरच्या काळांत मात्र दोन्हींमधील भेगा वाढायला सुरवात झाली, इतकेच नाही तर ध्येयवादाकडून हुश्शवादाकडे समाजाची वाटचाल होऊ लागली असे वाटते. म्हणूनच आजचा भारतीय नागरिक आपली कर्तव्य विसरला आहे कां हा प्रश्न पडतो. कर्तव्य विसरल्याच्या पाच खुणा मला दिसतात. शासन–स्तरावर एकंदरित तयार झालेले भ्रष्टाचाराचे वातावरण, संसाधनांचा अपव्यय, विकासातील असमतोल, शहरांमधून साचू लागलेल्या घाणींच्या खाणी, आणि शिक्षण व्यवस्थेची लागलेली वाट. यापैकी शेवटचे कारण मला सर्वात महत्वाचे वाटते.

आपल्याकडील सध्याची शिक्षण व्यवस्था ही ब्रिटिशांनी सुमारे १८५० पासून पुढे घडी बसवून दिलेली व्यवस्था आहे. सर्वच शिक्षणतज्ज्ञ मान्य करतात की या व्यवस्थेचे मूळ उद्दिष्ट ब्रिटिश राजवटीसाठी त्यांना लागणाऱ्या धर्तीची नोकरशाही तयार करणे हे होते. पण त्याचबरोबर सर्वजण हे ही मान्य करतात की या व्यवस्थेतून इतर कांही चांगले परिणाम देखील घडून आले- मुख्य म्हणजे सार्वत्रिक शिक्षणाची संकल्पना व त्यासाठी लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर देशभरांत तयार होणे हे दोन परिणाम साधले गेले. त्याआधी आपल्याकडे जी गुरूकुल पद्धती होती ती कितीही चांगली असली तरी इंग्रजांना ती संपवायची होती व तशी त्यांनी संपवली त्यातून सार्वत्रिक शिक्षण घडू शकले नसते, घडत नव्हते.

याचाच असाही अर्थ आहे की सार्वत्रिक शिक्षणासाठी लागणारे भलेमोठे इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्याची आर्थिक जबाबदारी ब्रिटिश राजवटीने उचलली होती. पण स्वातंत्र्यानंतर आणि विशेषतः १९८० च्या पुढे भारतीय राज्यकर्त्यांनी ही जबाबदारी शासनाला पेलवत नाही आणि वाढत्या लोकसंख्येच्या अनुषंगाने सरकार हवे तेवढे इऩ्फ्रास्ट्रक्चर उभे करू शकत नाही असे सांगत खाजगी शिक्षण व्यवस्थेला प्रोत्साहन पाठिंबा व सुखसोई (उदा. स्वस्त दरांत शेकडो एकर जागा) उपलब्ध करून दिल्या. मात्र त्यामधे शैक्षणिक फी सर्वांच्या आवाक्यामधील राहील ही काळजी अजिबात घेतली नाही. त्यामुळे शिक्षण व्यवस्था अति महागडी होत गेली. तिचे बाजारीकरण झाले त्याच बरोबर असलेल्या सरकारी शिक्षण व्यवस्थेला घरघर लागली. याचा पुरावा म्हणजे विविध शहरांतून बंद पडत चाललेल्या म्युनिसिपल शाळा.

हे होत असतानाच देशांत ग्लोबलायझेशनची मोठी लाट आली. मराठीत आपण वैश्वीकरण म्हणतो- पण मला वाटत की बाजारीकरण हा शब्द जास्त उचित आहे. १९८७-८९ या काळात रशियातील कम्युनिस्ट राजवटीला देखील घरघर लागली आणि अमेरीकेच्या फ्री मार्केट एकॉनॉमीचा सैद्धांतिक व व्यवहारिक पातळीवर विजय झाला. यामुळे देखील आपल्या देशांत सुरू झालेल्या ग्लोबलायझेशन च्या प्रक्रियेला गति आली. पूर्वीची LPQ पद्धत (License, Permit, Quota) जाऊन नवीन LPG पद्धत ( Liberalisation, Privatization, Globalisation) आली, रशिया- अमेरीकेच्या वादातील निकालामुळे LPG पद्धत फारच छान असे ठामपणे सांगितले जाऊ लागले. त्यातून शिक्षणाच्या बाजारीकरणाला अजूनही मोठे ग्लॅमर प्राप्त झाले. आधी पैशांचे वलय होते, त्याला आता बाजार व्यवस्थेचे अधिष्ठानही मिळून गेले. आतातर शिक्षणातही FDI येऊ घातल्याने शिक्षणाचे वैश्वीकरण व बाजारीकरण पूर्णत्वाच्या जवळ पोचत आहे. – अपूर्ण

Monday, July 19, 2021

माझे चिंतन - लेखक डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे प्रस्तावना

 माझे चिंतन - लेखक डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे 

प्रस्तावना

‘माझे चिंतन’ या माझ्या निबंध संग्रहाची ही दुसरी आवृत्ती आहे. पहिली आवृत्ती १९५५ साली प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर आता अनेक वर्षांनी माझे मित्र काँटिनेंटल प्रकाशनचे मालक श्री. अनंतराव कुलकर्णी ही दुसरी आवृत्ती प्रकाशित करीत आहेत.

पहिल्या आवृत्तीतले काही निबंध गाळून त्यांच्याऐवजी १९५५ नंतर लिहिलेले काही इतर निबंध या आवृत्तीत समाविष्ट केले आहेत. या निबंधांत काही जास्त महत्त्वाच्या समस्यांचा विचार केला आहे. जे निबंध काढून टाकले त्यातील विषयांपेक्षा हे विषय विद्यार्थ्यांच्या दृष्टीने जास्त महत्त्वाचे वाटल्यामुळे हा बदल केला आहे.

आपल्या समाजाचे अवलोकन व अभ्यास करताना त्यातील अनेक उणीवा ध्यानात येतात. अशा काही उणीवा समाजाला, विद्यार्थ्यांना, विचारवंतांना दाखवाव्या, त्यांचे मूळ कारण शोधावे, उपायचिंतन करावे आणि त्याविषयी सर्वांगीण अभ्यास करून मग त्या विषयांवर लेख लिहावा, अशी पद्धत सर्वसाधारणत: मी अनेक वर्षे अवलंबिली आहे. ‘माझे चिंतन’ हा बव्हंशी अशा लेखांचा संग्रह आहे.

ऐहिक जीवनातील राजकारण, समाजरचना, अर्थव्यवस्था, विज्ञान-संशोधन इ. क्षेत्रांतील विषय घेऊन त्यांचा शास्त्रीय पद्धतीने सांगोपांग अभ्यास करून त्यांवर मोठे ग्रंथ लिहावे ही प्रथा भारतात फारशी नाही; काही अपवाद वगळता प्राचीन काळीही नव्हती. ब्रिटिशांच्या पूर्वीच्या हजार वर्षांच्या काळात तर ती अपवादालाही नव्हती. गेल्या शंभर वर्षांत भारतात ग्रंथलेखन होऊ लागले आहे. पण ज्या मानाने समाजाला गरज आहे त्या मानाने ते फार अपुरे आहे. ही आपल्या समाजातील उणीव ‘सरस्वतीची हेळसांड’ व ‘ग्रंथसत्ता’ या दोन लेखांत मी मांडली आहे. पहिल्या लेखात ब्रिटिशपूर्व काळात वरील विषयांवर ग्रंथ न लिहिले गेल्यामुळे केवढी हानी झाली ते सांगितले आहे. दुसर्‍या लेखात समाजावर प्रत्यक्षात राजा, दंडशहा किंवा लोकसभा यांची सत्ता असली तरी खरी सत्ता ग्रंथांचीच असते, हा सिद्धांत विशद केला असून गेल्या शंभर वर्षांत कोणत्या ग्रंथांनी कशी सत्ता महाराष्ट्रावर व भारतावर प्रस्थापित केली आहे ते मराठी साहित्याचा मागोवा घेऊन सांगितले आहे. ग्रंथ हे समाजपरिवर्तनाचे मोठे साधन असल्यामुळे तरुण कार्यकर्त्यांनी ते साधन हस्तगत करून घ्यावे, हे सांगण्याचा त्यात हेतू आहे.

अध्यात्मज्ञान, भक्ती, नीती, समाजरक्षण, संवर्धन हा धर्माचा खरा गाभा होय. पण तो दुर्लक्षून टिळेटोपीमाळा हे जे कर्मकांड त्यालाच आपण खरा धर्म समजतो. साधुसंतांनी या कर्मकांडावर टीका करून भक्तीचे माहात्म्य वर्णिले हे खरे; पण तरीही भारतीय जीवनात कर्माकांडाचेच महत्त्व जास्त मानले गेले आणि मानले जात आहे. आपण ‘नरोटीची उपासना’ करतो याचा हा अर्थ आहे. या निबंधात धार्मिक दृष्टीने याचा प्रथम विचार करून नंतर सध्या शिक्षण, नियोजन या सर्वच क्षेत्रांत आपला कारभार कर्माकांडात्मक कसा झाला आहे ते त्या त्या क्षेत्रांतील उदाहरणे देऊन स्पष्ट केले आहे. एका परीने हा विषय जुनाच आहे; पण आजच्या काळाच्या संदर्भात व आजच्या जीवनातील उदाहरणे देऊन तो मांडलेला असल्यामुळे मानवी मनाच्या त्या दोषांमुळे कशी प्रगतीला खीळ बसली आहे ते ध्यानात येईल.

‘भारतीय जीवनातील क्रिकेट व हॉकी’ या निबंधाच्या नावावरून विषयाची काही कल्पना येणार नाही. हे दोन खेळ आपल्या जीवनाची दोन प्रतीके म्हणून घेऊन, संघटित जीवन, सामूहिक कार्यशक्ती यांचा आपल्या समाजातील अभाव या आपल्या महान दोषाचे विवेचन या लेखात केले  आहे. व्यक्ती या दृष्टीने पाहता जगातील थोर पुरुषांच्या तुलनेला येतील असे अनेक पुरुष ही भूमी निर्माण करू शकते. पण हे थोर पुरुष संघटित कार्य करू शकत नाहीत. यामुळे आपली सर्व गुणसंपदा वाया जात आहे, असा या निबंधाचा भावार्थ आहे. क्रिकेटमध्ये विक्रमी वीर आपल्याकडे आहेत, पण संघभावना नाही. म्हणून जगात कोणत्याच कसोटी सामन्यात आपल्याला जय मिळत नाही. उलट संघभावना प्रबळ असल्यामुळे हॉकीमध्ये आपण अजिंक्य ठरतो. असा तेव्हा इतिहास दिसत असल्यामुळे हे दोन खेळ प्रतीक म्हणून मी निवडले होते.

हा लेख १९५३ साली लिहिला आहे. त्यानंतरच्या पंधरा एक वर्षांत जरा उलटापालट झाली आहे असे दिसते. १९६४ सालानंतर हॉकीमधले आपले अजिंक्यपद गेले आणि क्रिकेटमध्ये इंग्लंडसारख्या बलाढ्य संघाशी सामना देऊन १९६२ साली आपण भारतात झालेल्या कसोटी सामन्यांत अजिंक्यपद मिळविले. न्यूझीलंड संघाविरुद्धही आपण दोन-तीनदा अजिंक्यपद मिळविले आहे. तज्ज्ञांच्या मते हे विजय संघभावनेचे आहेत. तेव्हा मनात येते की हीच भावना आणखी प्रबळ झाली तर वेस्ट इंडीज, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड या देशांत जाऊन तेथील कसोटी सामन्यांतही आपण अजिंक्यपद मिळविण्याचा संभव आहे. या संग्रहाची दुसरी आवृत्ती १९७० साली प्रसिद्ध झाली. आता ही तिसरी आवृत्ती प्रसिद्ध होत आहे. त्या दरम्यान असे प्रत्यक्ष घडलेच आहे. १९७१ साली इंग्लंडमध्ये व १९७२ साली भारतात आपण इंग्लिश क्रिकेट संघावर विजय मिळविला आहे. आणि क्रिकेट हा खेळ खरोखरच आपल्या जीवनाचे प्रतिबिंब दाखवीत असला, तर जीवनाच्या क्षेत्रांतही आपण सामूहिक कार्य करण्याची विद्या हस्तगत करण्यातही कदाचित यशस्वी होऊ!

‘समृद्धीचा शाप’ ही व्यथा अतिशय दु:खदायी आहे. जगांत आज अनेक देशांत बहुसंख्य लोकांना पुरेसे अन्नवस्त्रही मिळत नाही. अतिशय भीषण दारिद्र्यात निम्म्या पाऊण जगाला राहावे लागते. या दारिद्र्यामुळे मनुष्य साहजिकच गुन्हेगारीस प्रवृत्त होतो. अशा स्थितीत विज्ञानामुळे, नवीन उत्पादनसाधनांमुळे, यंत्रविद्येमुळे सर्वांना पुरेसे अन्न, वस्त्र, घर, शिक्षण, आरोग्य हे देता आले की समाज सुखी होईल, गुन्हेगारी नष्ट होईल व मानवसमाज संस्कृतीच्या वरच्या पातळीवर जाईल असे समाजशास्त्रवेत्ते म्हणत असत. पण प्रत्यक्षात झाले आहे ते अगदी उलटेच. पाश्चात्य देशांत आणि विशेषत: अमेरिकेत सर्व प्रकारची समृद्धी आली आहे. आपल्या तुलनेने पाहता तेथे नंदनवनच आहे. पण आश्चर्याची व खेदाची गोष्ट अशी की तेथे गुन्हेगारी, अनाचार, स्वैराचार, गुंडगिरी, मवालीपणा, पेंढारशाही यांना खळ तर पडत नाहीच, उलट समृद्धीच्या प्रमाणात हे रोगही वाढतच आहेत. ‘समृद्धीचा शाप’ या निबंधात त्याची कारणमीमांसा केली आहे.

‘विश्वाविरुद्ध’, ‘आमची फौजरदानिष्ठा’ व ‘चौथ्या दशांशाची दक्षता’ या निबंधांत भारतीयांच्या अंगच्या तीन फार मोठ्या वैगुण्यांचा विचार केला आहे.  

प्रत्येक समाजात धार्मिक, सामाजिक संस्था, रूढी, नियम यांना कालांतराने जडपणा येतो. त्यांची उपयुक्तता नाहीशी होते व त्यांत परिवर्तन होणे अवश्य असते. पण अशा संस्थांवर समाजाचे फार प्रेम असते, श्रद्धा असते. त्यामुळे त्या बदलण्यास तो तयार होत नाही. अशावेळी कोणातरी समाजसुधारकाने धैर्याने परिवर्तनाचे, क्रांतीचे तत्त्वज्ञान सांगणे व त्याचा आचार करणे अवश्य असते. समाज अर्थातच अशा समाजसुधारकांवर संतापतो, त्याला धर्मद्रोही, समाजद्रोही ठरवून जबर शिक्षा करतो, पुष्कळ वेळा मृत्युदंडही देतो. तरीही सर्व समाजाविरुद्ध जाऊन, देहदंडाची भीती न बाळगता, धैर्याने समाजाला नवे तत्त्व, नवे विचार सांगणे अवश्य असते. नाही तर कालबाह्य झालेल्या संस्था, घातक रूढी यांमुळे समाजाचा र्‍हास होतो. पण अशा प्रकारे सर्व समाजाविरुद्ध केवळ तत्त्वासाठी एकट्याने उभे राहण्याचे, प्रसंगी त्यासाठी आत्मबलिदान करण्याचे धैर्य अंगी असणारे पुरुष भारताच्या दीर्घ इतिहासात केव्हाच झाले नाहीत. युरोपात सॉक्रेटिस हा तसा पहिला धीर पुरुष झाला आणि पुढे रॉजर बेकन, बायक्लिफ, जॉन हस, मार्टिन लूथर असे अनेक धीर पुरुष पश्चिमेला लाभले आणि त्यांनी मोठी परंपराच निर्माण केली. हिंदुस्थानात आगरकर हे असे समाजसुधारक होते. पूर्वी अनेक शतके तसा पुरुष येथे कोणीच निर्माण न झाल्यामुळे हा समाज अधोगतीला गेला होता. पाश्चात्य विद्येच्या प्रसारानंतर हे विश्वाविरुद्ध एकाकी उभे राहण्याचे धैर्य या भूमीत हळूहळू निर्माण होऊ लागले. या धैर्याची जोपासना करण्यावरच समाजाची प्रगती अवलंबून आहे.

लोकसत्ताक राज्यपद्धतीला  हा गुण व पुढील दोन निबंधांत सांगितलेले गुण अत्यंत अवश्य आहेत.

स्वत:चे कायदे स्वत: करणे हे स्वातंत्र्य आणि अनियंत्रित सत्तेने, राजाने किंवा आक्रमकांनी आपल्यासाठी कायदे करणे हे पारतंत्र्य. पण स्वातंत्र्याकांक्षी समाजातील प्रत्येक व्यक्तीने आपल्या समाजाने केलेले कायदे स्वत:हून, खुशीने, निष्ठेने पाळले तरच लोकसत्ता जगू शकते. आपल्या समाजात ही वृत्ती अजून निर्माणच होत नाही. आपण कायदा पाळतो तो पोलिसाच्या भीतीने, तुरुंगाच्या धाकाने. तो नसेल तर आपण कायदा पाळीत नाही; इतकेच नव्हे तर तो न पाळण्यात भूषण मानतो. याचाच अर्थ असा की आपण फौजदारनिष्ठ लोक आहोत. ‘आमची फौजदारनिष्ठा’ या निबंधात या घातक प्रवृत्तीचे विवेचन केले आहे.

ब्रिटिशपूर्व काळात हजार दीडहजार वर्षे या भूमीत विज्ञानसंशोधन लुप्तच झाले होते. इंग्रजी राज्य झाल्यापासून ते पुन्हा सुरू झाले आणि गेल्या शंभर दीडशे वर्षांत या देशात विज्ञानाचा प्रसारही पुष्कळ झाला आहे. पण येथे अजून वैज्ञानिक मनोवृत्ती फार थोडी दिसून येते. रेखीवपणा, काटेकोरी, सूक्ष्म अभ्यास, कातीव हिशेब, अणूपरमाणूंच्या गणनेचीही दक्षता हे गुण विज्ञानाने येतात. त्यांचा अभाव हे फार मोठे वैगुण्य आपल्या समाजात आहे. फ्रान्स व जर्मनी यांच्यातील एका युद्धाच्या आधारे प्रथम या विद्यानिष्ठेची महती सांगून मग भारतातील तिच्या अभावाच्या कारणांची मीमांसा ‘चौथ्या दशांशाची दक्षता’ या लेखात केली आहे.

‘भगवान श्रीकृष्ण’ हा जरा निराळ्या प्रकारचा निबंध आहे. त्यात आपल्या समाजातील वैगुण्याचा विचार नाही. श्रीकृष्णचरित्राचे रहस्य त्यात सांगितलेले आहे. श्रीकृष्ण हा हिंदुस्थानात परमेश्वराचा अवतार गणला जातो. त्याच्या गोकुळच्या लीला आणि त्याची गीता एवढ्याचाच सामान्यत: भारतीयांना परिचय असतो. पण महाभारतात याहून फार निराळे असे त्याचे चरित्र दिसून येते. तो एक असामान्य, अलौकिक, अद्वितीय पण मानवी पुरुष होता, असेच त्याचे रूप महाभारतावरून दिसते. त्या रूपाचे वर्णन या निबंधात केले आहे. विश्वरूपदर्शनापेक्षा मला ते जास्त प्रिय आहे.

‘युद्ध अटळ आहे काय?’- ही काहीशी तात्त्विक चर्चा आहे, असे वाटेल. काही अंशी ती तशी आहेही. पण सर्वस्वी नाही; कारण कॉमन मार्केटच्या उदाहरणावरून, अगदी अंधुक का होईना, पण तशी आशा करण्यास जागा आहे असे वाटते. आणि आपल्या विकासासाठी चिरकालीन शांततेची अपेक्षा धरणार्‍या भारताने तर त्या अंधुक आशेच्या बळावर सतत प्रयत्नशील राहणेच हितावह होईल. असे असल्यामुळेच आणि सर्व जगापुढील ती अत्यंत जटिल समस्या असल्यामुळे त्या निबंधाचा या संग्रहात समावेश केला आहे.

‘माझे चिंतन’ या माझ्या पुस्तकाची प्रथमावृत्ती प्रसिद्ध झाल्यानंतर अनेक वाचकांची मला पत्रे आली. आपल्या समाजाच्या अगदी जिवाला लागलेल्या अशा या समस्या आहेत, असे त्यांचेही मत दिसले.

अशा समस्यांचे विवेचन करणार्‍या या निबंधांचा अभ्यास विद्यार्थ्यांनी व तरुणांनी भावी जीवनाच्या दृष्टीने करावा. या अभ्यासामुळे त्यांच्या विचारांना काही निश्चित दिशा लागेल अशी आशा मी करतो.

पु. ग. सहस्रबुद्धे

 

********************************* 


Saturday, June 05, 2021

हिंदू धर्म में संन्यास - महानगर 3 मई 1995

 

हिंदू धर्म में संन्यास (महानगर बुधवार 3 मई

1995)

पश्चिमी दुनियामें बहु-चर्चित जितनी भी आधुनिक मैनेजमेंट टेकनिककी किताबें हैं, उन सबमें एक सूत्र समान है, वह यह कि किसी उद्योग या व्यवसायमें सफल होनेके लिए मनुष्यका महत्वाकांक्षी होना आवश्यक है यही सूत्र वहांके वरिष्ठ प्रशासकीय अधिकारियों पर भी लागू किया जाता है और कई बार भारतीय अधिकारी भी इस सूत्र से प्रभावित हो ही जाते हैं। इसके बावजूद भारतीय प्रशासनमें कई ऐसे अधिकारी पाये जाते हैं जो अपनी कर्तव्यदक्षता, ईमानदारी और काममें अच्छा अंजाम देनेवाले हैं, जनसामान्यके प्रश्नोंके प्रति संवेदनशील हैं पर फिर भी उन्हें महत्वाकांक्षी नहीं कहा जा सकता। वे अपना काम अच्छी तरह निभा लेनेमें ही अपनी महानता समझते हैं और इस बातकी परवाह नहीं करते कि उन्हें अच्छा पद दिया जा रहा है या नहीं। थोडे शब्दोंमें कहा जाय तो उनके लिए उचित शब्द होगा अलमस्त या फक्कङ। इसीलिए एक दिन हमारी चर्चा मंडलीमें यह चर्चा चली कि हमारा आदर्श कौन है? एक अफसर जो बडा ही एफिशंट और बडा ही महत्वकांक्षी है, या वह जो कामका तो पक्का है लेकिन अपनी अलमस्तीमें खुश है, संतुष्ट है। अब यह भी तय है कि ऐसा प्रश्न किसी पश्चिमा चर्चा मंडलीमें तो उठेगा ही नहीं क्योंकि पश्चिमि सोसायटीमें महत्वाकांक्षी न होना अपने आपमें ही एक कमी या कमजोरी मानी जायेगी। लेकिन भारतीय संस्कृतिने संतोषको एक कमजोरी नहीं वरन गुण कहकर जाना है। जब आवै संतोष धन सब धन धूरि समान। अतः सवाल उठा कि क्या यह संतोषकी मानसिकता आजके युगमें भी कोई मायने रखती है, क्या यह भारतीय प्रशासनिक व्यवस्थामें खतरनाक हो सकती है? वहांसे फिर बात आयी धर्म पर और संन्यास पर.

हिंदू फिलोसफीमें चार पुरूषार्थ बताये गये हैं- वे भी एक नियम, एक क्रमसे। पहले मनुष्य धर्म नामक पुरूषार्थको हासिल करें, फिर अर्थको, फिर कामको और फिर मोक्षको। यहां अर्थ शब्दके माने है संपत्ति या संपन्नता- लेकिन वही संपत्ति जो धर्मका आचरण करते हुए मिली हो - अर्थात अपने श्रम, कार्य कुशलता और उत्पादकताके कारण मिली हो न कि चोरी, डकैती, छल- कपट, घूसखोरी या जुएबाजी से। तीसरा पुरूषार्थ है काम- या उपभोग अर्थात् जो धन कमाया है उसका उपभोग या योग्य कार्यमें उस धनका विनियोग करना यह योग्य उपभोग इसलिए आवश्यक है कि इससे जीवनमें एक प्रकारकी स्थिरता, सुरक्षितता आती है और ऐसा वातावरण तैयार होता है जिसमें स्वयंका ज्ञान और कला सुचारू ढंगसे पनप सकते हैं - बढ सकते हैं। साथ ही योग्य उपभोगको प्रश्रय देनेपर उन कलाकारों और कारीगरोंकी कलाको भी प्रश्रय मिलता है जिनकी आजीविका उसपर निर्भर है।

इन पुरूषार्थोंको जो हासिल कर लेता है- वही अगली सीढी अर्थात मोक्षके चौखट तक पहुंच सकता है और वहां पहुंचना हरेकके लिए वांछनीय बताया गया है। वहांसे अंदर जानेका उपाय बताया है संन्यास ग्रहण लेकिन संन्यासका अधिकार भी हर व्यक्तिको उपलब्ध नहीं है मनुष्य पहले ब्रह्मचर्य आश्रमका पालन करते हुए ज्ञान अर्जन करे- पढाई करे। फिर गृहस्थ आश्रमका पालन करते हुए अपनी कार्यकुशलतासे धन अर्जन करे। साथ ही धर्मका पालन भी करता रहे जिसकी रीति उसे ब्रहमचर्य आश्रममें सिखायी गयी है दोनों आश्रमोंके लिए पच्चीस- पच्चीस वर्षका काल उपयोगी बताया है इसी कालमें मनुष्य अपने धनका उपभोग भी करे- उसके माध्यमसे अपनी परिवारकी वृद्धि औ समृद्धी भी करे

फिर वह वानप्रस्थ आश्रम ग्रहण करे अर्थात् जिस व्यवसायको उसने गृहस्थ आश्रमके दौरान चलाया या बढाया- उसकी जिम्मेदारी बच्चोंको, नयी पीढीको सौंप दे, नयी पीढीको जिम्मेदारी उठानेके लिए सक्षम करे इस दौरान वह नयी पीढीके लिए दूरसे पथ- प्रदर्शकका काम करता रहे. कभी- कभार सलाह मशविरा दे दे यदि संभव हो तो स्वयं वनमें जाकर रहेसंकटकाल हो तो वापस आकर मदद करे लेकिन रोजाना कामकाजकी जिम्मेदारी और अधिकार दोनों ही नयी पीढीपर सौंप दे यदि संभव हो तो स्वयं वनमें जाकर रहे इसीलिए आयुकी इस अवस्थाका नाम है वानप्रस्थ आश्रम- अर्थात् वनकी ओर, प्रकृतिकी ओर,प्रस्थान करनेकी अवस्थावहां वनमें वह अपनी जरूरतोंको कमसे कम करता रहे साथ ही कुछ और ज्ञानार्जन भी करता रहे

इन सारे अनुभवोंसे गुजरने के बाद यदि वह अपने आपको योग्य और सक्षम समझे तो फिर किसी योग्य गुरूके परामर्शसे संन्यास आश्रमकी दीक्षा ले

इस प्रकार हम देखते हैं कि ब्रहमचर्य, गृहस्थ और वानप्रस्थ आश्रमका विधान तो सबके लिए बताया गया है लेकिन संन्यास आश्रमका विधान सबके लिए नहीं है - यह केवल सुयोग्य और दृढ व्यक्तियोंके लिए है

यह इसलिए कि हिंदू दर्शनके अनुसार संन्यासीपर बडी जिम्मेदारी है समाजको रास्ता दिखाने की संन्यास लेने वाला मनुष्य अपना पहला नाम या परिवारके साथ जुडी हुई अपनी पहचानको छोड देता है फिर वह न किसीका पिता है न पुत्र, न किसीकी माता है ना बहन ना पत्नी इसका प्रतीक है मुंडन यहां उसका व्यक्तिगत जीवन समाप्त हो जाता है और सामाजिक जीवन प्रांरभ हो जाता है फिर वह केवल समाजके लिए ही जीता है- वह भी समाजसे न्यूनतम दानको स्वीकार करते हुए।

संन्यासीके लिए भिक्षाका विधान है- ताकि उसे हर पल यह भान रहे कि वह समाजके दातृत्व पर जी रहा है और इस दानको उसे चुकाना भी है बदलेमें समाजको ज्ञानदान देकर और सही रास्ता समझाकर उसके लिए विधान है कि वह पांचसे अधिक घरोंमें भिक्षा न मांगे जूठा या बासी अन्न भिक्षामें स्वीकार न करे इस नियममें कभी भूखा रहना पडे तो रह ले एक गांवमें तीन दिनसे अधिक दिनों तक न रहे केसरिया वस्त्र धारण करे और अपने सामानमें केवल एक कमंडल रखे यह कमंडल या तूंबा जंगली लाल कद्दूका बना होता है जिसमें दो खाने बने रहते हैं निचले खानेमें वह अपने लिए दूसरी जोडी वस्त्र रख सकता है ऊपरके खानेमें भिक्षाका अन्न, या पानी इसके सिवा वह और कुछ संग्रह नहीं कर सकता है

संन्यासी केसरिया रंगका वस्त्र ही धारणा कर सकता है इसका कारण है कि केसरिया रंगको त्याग, तपस्या, उत्सर्ग, बलिदान, वीरता, ज्ञान और संतोषका रंग माना गया है मानस शास्त्रमें रंगोंका मनपर पडने वाला प्रभाव जिस किसीने पढा होगा या प्रयोग किये होंगे वही बता सकता है कि केसरिया रंग इन गुणोंके साथ कैसे जुड गया भारतमें जो सब कुछ त्यागकर संन्यासी बन गया हो वह केसरिया वस्त्र पहनता है या फिर जो वीरमरणके लिए सारे मोहको त्याग चुका है वह केसरिया वस्त्र पहनता है साथ ही जो लंबी तीर्थयात्रा पर जा रहा है वह केसरिया पताका लिए चलता है क्योंकि केसरिया रंग सांसारिक मोहसे लग हटनेका प्रतीक तो है, लेकिन समाजसे दूर हटनेका प्रतीक नहीं हैं, बल्कि अपने आपको समाजके लिए उपलब्ध और उत्सर्ग करनेका प्रतीक है। यह तभी संभव है जब मनुष्यके पास संतोष हो एक संन्यासी संसारको तभी लीडरशीप दे सकता है यदि वह ज्ञानी हो, अपने काममें कार्यकुशल और प्रवीण रह चुका हो, जिसने अपने ज्ञानको खूब घिसकर और तपाकर सोनेकी तरह खरा कर लिया हो अब ऐसे संन्यासीको देखकर कोई आलसी आदमी सोच सकता है कि मैं भी केसरिया वस्त्र पहनकर भिक्षा मांगता चलूं तो बिना काम किये ही मेरा पेट भर सकता है लेकिन केवल केसरिया वस्त्र पहनकर एक आलसी आदमी एक ज्ञानी संन्यासीके समकक्ष नहीं हो सकता है

यही अंतर है संतोष या अलमस्तीके प्रसंगमें भीएक निखटटू और औसत काम करेवाला अफसर भी कहा सकता है कि भई मैं तो खुश हूं, संतुष्ट हूं, मुझे कोई ज्यादा काम नहीं करना पडता है और ज्यादा सिर भी नहीं खपाना पडता है पर उसकी संतुष्टि उसके आलसके कारण उपजी है और वह संतुष्टि किसी गुणका प्रतिक नही है उससे वह अफसर भला जो महत्वाकांक्षी है और अपनी महत्वाकांक्षा पूरी करनेके लिए मेहनत और अच्छा काम करने को तत्पर है लेकीन उससे भी अच्छा वह अधिकारी है जो कर्तव्यतत्पर होते हुए भी अपने आपमें संतुष्ट है, परिपूर्ण है, अलमस्त है, इस या उस पोस्टके पीछे नहीं दौडता क्योंकी वह जानता है कि उसका बडप्पन उसक पोस्टपर निर्भर नहीं है वह तो उसका अपना अंदरूनी बडप्पन है क्योंकी अपना काम बेहतरसे बेहतर कर दिखानेकी धन उसकी खुदकी है एक बेहतर कामको कर निभानेका आनंद और उससे उपजी संतुष्टि उसके पास है

बेहतर कामसे एक अलग तरहका अहंकार भी उपज सकता है जो कार्यकुशलता के लिए घातक भी हो सकता है यह अंहकार भी महत्वाकांक्षाका दूसरा रूप है.लेकिन महत्वाकांक्षा और अहंकारसे ऊपर उठकर जिसने कार्यकुशलताके साथ संतोषकी अवस्था प्राप्त की है उसकी अवस्था उस ज्ञानी- संन्यासी जैसी है इस प्रकार हम देखते हैं कि सच्चा संतोष और आनंद तो कार्यकुशलताके कारण ही उपज सकता है लेकिन मूढ व्यक्ति अपने आलसको ही अपनी अलमस्ती बतायेगा, उसे संतोषका नाम देगा आलसमें और कार्यकुशलतासे उत्पन्न होने वाले संतोषमें फर्क कर सकें यह समझ मूढ व्यक्तिमें नही होगी परन्तु हमारे अंदर होनी चाहिए

और धर्म भी क्या है? धारयति इति धर्मः जो हमें अपने आपको धारण करनेकी, अर्थात् अपन आंतरिक दृढताको और साथ ही समाजकी आंतरिक समन्वयको बनाये रखनेकी सामर्थ्य देता है- वही धर्म है वह धर्म कार्यकुशलताके बगैर भी नहीं आता लेकिन संतोषके बगैर भी नहीं आता

कार्यकुशल व्यक्तिका महत्वाकांक्षी होना स्वाभाविक है पश्चिमी मैंनेजमेंट गुरू आज चीख चीखकर कहते हैं महत्वाकांक्षी बनो- क्योंकि महत्वाकांक्षा पूरी करनेके लिए ही सही- व्यक्तिको अपने काममें कुशलता लानी पडती है। लेकिन कार्यकुशलता और महत्वाकांक्षाके बाद तीसरी सीढी है संतोष जिसके बगैरे व्यक्ति या समाजका आंतरिक समन्वय अधिक दिन तक नहीं टिकेगा। इसीलीए चाहिए संन्यासी वृत्ति भी यहीं भारतीय मानसिकता पश्चिमी मैनेजमेंटसे अलग हो जाती है