Monday, August 26, 2013

Sliding Rupee

Sliding Rupee





(3)
IF RUPEE IS SLIDING WE NEED TO WATCH 5 FACTORS
Import items and their Bill -- MINUS SIDE
Export items and their earning -- PLUS SIDE
Remittances sent by Indians abroad (including profits earned by Indian companies outside and sent back here) -- PLUS SIDE
Remmittances taken out by foreigners here + profits taken away by foreign companies operating here. -- MINUS SIDE
Debt repayment made every year -- MINUS SIDE

----------------------------------------------------------------------------------------------

(4)
To stop devaluation of Rupee and downfall of economy --
1st -- watch which leaders are using this to convert their swiss-money to Rupees for spending in election. What is our economics-intelligence wing doing? Remember it is same wing that could not stop the tax evasion of hasan Ali since 1975.
2nd -- work for reducing energy-wastage. Let there be public monitoring of our petroleum imports Vs home-production vs unfulfilled but unpunished promises of home production and also our petro-exports.
3rd -- Start asking what is the profit-in-dollars carried away every quarterly by the top-50 Foreign investors and who are they. Do we need them really ?

--------------------------------------------------------------------------------------------

कोयला घोटाळ्याच्या फाइली गायब करवून जिंदल, अंबानी, दर्डा सोबतच यांच्याकडून कमिशन खाणारे पण वाचणार आहेत. आजच अंबानीने आपले पहिले दिलेले बयान फिरवले अशी बातमी आहे. सुप्रीम कोर्टाने 2जी लिलाव रद्द केले तसेच या सर्व बेनिफिशियरीवरच प्राथमिक ठपका का ठेवला जाऊ नये. रद्दी कागद विकून पैसे मिळावे म्हणून तर कोणीही फाइली चोरत नाही. पोलिसांकडे काय एफआय़आऱ दाखल झाली तिच्याइतकी हास्यास्पद दुसरी गोष्ट आहे का हे ही तपासायला हवे.

--------------------------------------------------------------------------------------------------

वॉटर प्यूरीफायर बनवणारी एक कंपनी -- प्यअर इट -- तिची जाहीरात मला खटकते-- ऑब्जे्शनल वाटते. कारण पाणी शुद्ध करण्यासाठी ते उकळणारी मंडळी किती चूक आहेत -- ती वर्षाकाठी तीन सिलिंडर गॅस वाचवू शकतात -- अशा या जाहिरातीत प्युअर इट यंत्र वापरल्याने वीजेचा खर्च किती वाढणार ते सांगितले जात नाही -- जणू काही ती फुकटच मिळणार असते.

-----------------------------------------------------------------------------------------------------

Govt wants to spend consultancy fees worth many lakhs to understand why no delivery of govt schemes reaches people. In my view it is a waste of money.
I agree with many others who feel that state administration knows about many of the problems of the state and the administrative machinery. There might be some blind corners but to identify those blind corners we don't need to appoint high profile e...
See More

------------------------------------------------------------------------------------------------------------------


On my Marathi article "Sliding Rupee and Common Man" where I had argued that answer to sliding rupee is not higher FDI (which in long term is detrimental to national interest) but reducing wastage in petroleum and energy sector, a FB friend Prathamesh Murkute drew my attn to DGCIS website and I found the following import statistics on that supporting my suspicion about petroleum being the major reason about which we need a strong Conservation policy.
 — with Sanjay Barve and 13 others.

Monday, August 12, 2013

रुपयाची घसरण आणि सामान्य माणूस

रुपयाची घसरण आणि सामान्य माणूस


*****लीना मेहेंदळे******
रुपयाची घसरण ही आपल्या देशातील कित्येक अर्थतज्ज्ञांच्या दृष्टीने, तसेच सत्ताकारणी लोकांच्या दृष्टीनेही एक अत्यंत स्वागतार्ह बाब आहे. हा देश डिट्टो अमेरिकेसारखा बनावा असे शेकडो सत्ताकारणींना व कित्येक पक्षांना वाटत आलेले आहे. डिट्टो अमेरिका म्हणजे काय, तर अमेरिकेसारखेच जागोजागी मॅकडोनाल्ड, केएफसी, वॉलमार्ट असे मोठे अमेरिकन ब्रॅण्ड आपल्याकडेही असले पाहिजेत. आपल्याकडे अमेरिकन वस्तू मुबलकपणे मिळाल्या पाहिजेत. फ्री मार्केट इकॉनॉमी, एलपीजी धोरण, वगैरे असले पाहिजे. सरकार कुठेच नसले पाहिजे. वगैरे.
मी शाळा-कॉलेजात औपचारिक (फॉर्मल) पध्दतीने अर्थशास्त्र शिकले नव्हते. मग देशातील दिग्गज व डॉक्टरेट मिळविलेल्या अर्थशास्त्रज्ञांच्या ज्ञानाची व मला उमगलेल्या अर्थशास्त्राच्या ज्ञानाची कशी तुलना होऊ शकेल? या देशातील अर्थशास्त्राचे शिक्षण न घेतलेल्या कोटयवधी लोकांना हाच प्रश्न पडत असेल आणि अर्थकारणाची फळे जिथे-जिथे त्यांच्या जीवनात अडचणी निर्माण करतात, त्याबद्दल नेमके बोट कुठे ठेवायचे? यावरही त्यांना मौनच बाळगावे लागत असेल. अर्थशास्त्राचे औपचारिक शिक्षण घेतलेल्या मोजक्या व तसे शिक्षण न घेतलेल्या कोटयवधी लोकांमध्ये एक मोठा फरक असा आहे की, पहिल्या वर्गात मोडणारे तज्ज्ञ छातीठोकपणे सांगू शकतात की दरडोई दररोज छत्तीस रुपये मिळवणारा माणूस गरीब नसतो – अमीर असतो. आणि दुसऱ्या वर्गात मोडणारे लोक म्हणतात – वाढत्या महागाईत छत्तीस रुपये दररोज मिळवून आम्ही जास्तीत जास्त रोज दोन वेळच्या झुणका-भाकरीची गॅरंटी घेऊ शकतो; पण जगण्यासाठी लागणाऱ्या इतर कोणत्याच गोष्टी मिळवू शकत नाही – घर, कपडे, औषध, शिक्षण, क्वचित प्रसंगी मनोरंजन आणि आराम, फिरणे, पौष्टिक अन्न – यापैकी काहीही आम्ही त्या बजेटमध्ये बसवू शकत नाही. पण हा जो दुसरा वर्ग हे जे अनुभवाचे बोल बोलतो, ते बोल आपल्या देशात अज्ञानीपणाचे समजले जातात की नाही? रुपयाच्या घसरणीबाबत माझे विचारदेखील माझ्या अज्ञानाचेच द्योतक असू शकते आणि तरीही ते विचार लिहून काढण्याचे मी धाडस करत आहे.
रुपयाची घसरण ही आपल्या देशातील कित्येक अर्थतज्ज्ञांच्या दृष्टीने, तसेच सत्ताकारणी लोकांच्या दृष्टीनेही एक अत्यंत स्वागतार्ह बाब आहे. हा देश डिट्टो अमेरिकेसारखा बनावा असे शेकडो सत्ताकारणींना व कित्येक पक्षांना वाटत आलेले आहे. डिट्टो अमेरिका म्हणजे काय, तर अमेरिकेसारखेच जागोजागी मॅकडोनाल्ड, केएफसी, वॉलमार्ट असे मोठे अमेरिकन ब्रॅण्ड आपल्याकडेही असले पाहिजेत. आपल्याकडे अमेरिकन वस्तू मुबलकपणे मिळाल्या पाहिजेत. फ्री मार्केट इकॉनॉमी, एलपीजी धोरण, वगैरे असले पाहिजे. सरकार कुठेच नसले पाहिजे. वगैरे.
दुसरीकडे आहे देशातील सर्वात मोठा सत्ताधारी पक्ष व त्यांचे अर्थतज्ज्ञ. त्यांनाही वरीलप्रमाणेच सर्व हवे आहे व हे येण्यासाठी सध्याची रुपयाची घसरण ही अत्यंत मोलाची गोष्ट आहे. रुपया घसरला की अमेरिकी गुंतवणूकदारांना प्रत्येक डॉलरमागे जास्त रुपये मिळतात, त्यामुळे ते भारतात येण्यासाठी आकृष्ट होतात. सबब त्यांना पोषक वातावरण देण्यासाठी प्रत्येक क्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीसाठी (FDIसाठी) जास्तीत जास्त टक्केवारी खुली करायची. अशा रीतीने कृषी बी-बियाणे, पशुधन यापासून ते शिक्षण, विमा, आरोग्य, पायाभूत सुविधांची उभारणी, संरक्षण, पोलीस, सैन्य, प्रशासन अशा सर्व क्षेत्रांत विदेशी कंपन्यांना शंभर टक्के FDIची परवानगी दिल्याने भारतीय अर्थव्यवस्था खऱ्या अर्थाने ‘फ्री’ होईल. मग आपला देशही अमेरिकी बनेल. रुपया हे चलन जाऊन प्रतिष्ठेचे प्रतीक असलेले डॉलर हे चलन भारतात रुजेल. लोकांच्या खिशात रुपयाऐवजी डॉलर खुळखुळतील. देशाचे सकल राष्ट्रीय उत्पन्न (GDP) वाढेल.
या संपूर्ण ‘गुलाबी चित्रा’मध्ये विसंगती किंवा चूक काहीच नाही. किंबहुना ती तशी असेल याची धास्ती घेण्याचेही कारण नाही. ‘ऑल इज वेल – बिकॉज डॉलर्स आर कमिंग फ्लाईंग हियर. दे आर कमिंग टू स्टे. सो, लेट अस सेलिब्रेट!’
या ‘फ्लाईंग फ्लाईंग’ येणाऱ्या डॉलर्सपैकी खूप मोठी रक्कम राजकीय पक्षांना मिळू शकते, हे आपल्याला एन्रॉन प्रकरणाने दाखवून दिले आहे. खुद्द अमेरिकेत जेव्हा एन्रॉनने भागदारकांना फसवण्याची केस कोर्टात उभी राहिली, तेव्हा एन्रॉनची भारतीय प्रमुख रिबेका मार्क हिने तिच्या भारतातील गौरवास्पद कामगिरीचा पाढा अमेरिकन कोर्टापुढे वाचला होता. त्यात तिने त्या दिवसापर्यंत एन्रॉनने भारतात केलेल्या एकूण गुंतवणुकीच्या दीड ते दोनपट नफा अमेरिकेत परत नेऊन भागधारकांचा फायदाच करून दिला, याचे सविस्तर वर्णन केले होते. अशा परिस्थितीत कोणत्या राजकीय पक्षाला परदेशी गुंतवणूकदारांकडून मिळणारे डॉलर्स नको आहेत? मात्र यामुळे देशात वीज स्वस्तही झाली नाही. म्हणूनच रुपयाच्या घसरणीची चिंता कुणाला आहे – याचे उत्तर दोन प्रकारांनी दिले जाऊ शकते.
देशातले दोन्ही मोठे पक्ष व कित्येक इतर पक्ष मानतात की अमेरिकी व पाश्चिमात्य गुंतवणूकदारांसाठी देशातील सर्व व्यवहारांची दालने शंभर टक्के खुली केल्याने विकास व प्रगती होते. त्यामुळे रुपयाची घसरण हा काळजीचा विषय अजिबात नाही. त्यांचे दुसरेही एक लॉजिक आहे. देशातील एेंशी-नव्वद टक्के जनतेला पाश्चिमात्य देशांशी थेटपणे आयातीचा किंवा निर्यातीचा व्यवहारच करायचा नसतो. मग त्यांच्या दृष्टीने पाहू गेल्यास अमेरिकी डॉलर रुपयाच्या तुलनेत कुठेही गेला तरी फरक पडत नाही. दोन वर्षांपूर्वी पंचेचाळीस रुपये ही एका डॉलरची किंमत होती. आज तिने साठीचा उंबरठा ओलांडला आहे. पण त्यामुळे खेडयातील दररोज पंचवीस रुपये मजुरी मिळवणाऱ्या शेतमजुराला काय फरक पडतो? त्याला कुठे डॉलर विकत घेऊन साठवायचे असतात?
मला मात्र हे सर्व चित्र ‘गुलाबी’ न दिसता काटेरीच दिसते. सर्वांत आधी दिसतात ते आपल्याकडे आयात केल्या जाणाऱ्या वस्तू. सोन्याच्या आयातीमुळे रुपया घसरला, असा सरकारने शोध लावला. पण आपल्या देशाचे एकूण बजेट आणि आयात होत असलेल्या सोन्याची किंमत यांची तुलना केली तर ही आयात किती टक्के असेल? या ऐवजी मी आपल्याकडील पेट्रोलियम तेलाच्या आयातीची व बजेटची तुलना करते. ही आयात कायम वाढत आहे व त्यामध्ये आपले सर्वाधिक परकीय चलन खर्च होते. यापैकी फार थोडा वाटा आपण प्रोसेस करून निर्यात करतो व त्यातून फार थोडे परकीय चलन मिळवतो. कारण आपली देशांतर्गत ऊजर्ेची गरज खूप मोठी आहे आणि त्यातील खूप मोठा हिस्सा आपण वाया घालवतो. त्या पेट्रोलियम क्षेत्राचे आयात-बिल 150,000 कोटींच्यावर आहे. त्या पेट्रोलियमचा अपव्यय टाळावा म्हणून ज्या दोन संस्था (PCRA – पेट्रोलियम कॉन्झर्वेशन रिसर्च असोसिएशन आणि BEE – ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सी) अस्तित्वात आहेत, त्यांचे एकत्रित बजेट तीन कोटींच्या आसपास आहे. आपण ‘खासगी क्षेत्राला स्वातंत्र्य’ देण्याच्या नावाखाली देशातील उर्जेचा खूप अपव्यय करतो – इतका, की आपण जपानच्या तुलनेत त्याच परिणामासाठी सातपट जास्त ऊर्जा खर्च करतो. आणि हे सर्व आपण खासगी क्षेत्रासाठी करतो. उदाहरणार्थ – कारवाल्यांचा धंदा चालावा म्हणून कोणत्याही मोठया शहरात चांगली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था येऊ द्यायची नाही (उदा. पुणे), किंवा कोकाकोला – भरमसाठ पाणी घेऊन जलस्रोत भूगर्भाखाली गेले की तिथून पाणी उपसण्यासाठी मोठा डिझेल खर्च, किंवा मोठया शहरात कचरा वाहतूकदारांना धंदा मिळावा म्हणून कचरा व्यवस्थापनाचे विकेंद्रीकरण होऊ द्यायचे नाही, किंवा खाजगी शाळांचा धंदा चालावा म्हणून नेबरहूड स्कूल (म्हणजे शहरात प्रत्येक मुलाने घरापासून अर्धा किलोमीटरच्या आतील शाळेतच प्रवेश घ्यायचा) ही कल्पना अंमलात येऊ द्यायची नाही, अशा प्रकारे हजारो उदाहरणे मोजता येतील.
आपल्या एकूण आयात-बिलाच्या चाळीस ते पंचेचाळीस टक्के खर्च पेट्रोलियम आयातीवर होतो. निर्यातीतून तेवढे परकीय चलन उभे करायचे, तर देशातील उत्पादन-क्षमता वाढली पाहिजे हे जितके खरे, तितकेच जो शेती व्यवसाय आज निष्प्रभ होत चालला आहे, त्याला ऊर्जितावस्था येऊ देणे हेही गरजेचे व खरे आहे. प्रत्येक देशाने त्याच्याकडे ज्या नैसर्गिक स्रोतांची समृध्दी आहे, त्या क्षेत्रात उत्पादनवाढ करून आर्थिक संपन्नता मिळवावी, असे गेल्या शतकातील सर्वश्रेष्ठ अर्थतज्ज्ञ ऍडॅम स्मिथ सांगतो. भारताचे नैसर्गिक स्रोतांची समृध्दी असलेले क्षेत्र आहे कृषिउद्योग, जिथे दर युनिट जीडीपी उत्पन्नामागचा खर्च औद्योगिक क्षेत्राच्या तुलनेत फक्त पन्नास ते सत्तर टक्के आहे. तरी आपण सेंद्रिय शेती, सौर-शक्ती या क्षेत्रांकडे दुर्लक्ष करतो. त्यासंबंधीच्या व्यवसाय शिक्षणाकडे दुर्लक्ष करतो. सेंद्रिय शेतीतून निघालेल्या मालाला जागतिक स्तरावर मोठी मागणी आहे. पण आपण जनुकीयदृष्टया बदल केलेली बियाणे आणि भरमसाठ खते अशा बाबींवर आधारित शेतीला प्रोत्साहन देतो, ज्यामुळे आपण जागतिक निर्यात बाजारपेठेत स्थान मिळवू शकत नाही आणि दुसरीकडे अापल्या शेतीच्या व्यवस्थापनातदेखील पेट्रोलियम ऊर्जेचा खूप दुरुपयोग होतो. मग पेट्रोलियम आयात-बिल वाढते.
आपल्या परकीय गंगाजळीला पडणारा दुसरा खड्डा असतो आपण जागतिक संस्थांकडून उचललेल्या कर्जावर व्याज देण्यासाठी. अर्थसंकल्प सादर करताना देशाला का नाही सांगितले जात की सरकारच्या एकूण उत्पन्नापैकी निव्वळ जागतिक व्याजापोटी किती टक्के उत्पन्न बुडते – आणि त्यामुळे रुपया किती घसरतो?
रुपया घसरणे देशाला अपायकारक की उपकारक? हा प्रश्न विचारताना ‘देश म्हणजे कोण?’ याची व्याख्या आधी झाली पाहिजे. अगदी सहजपणे समजून येणारे गणित सांगते की रुपया घसरला तर सगळयात आधी पेट्रोलियम पदार्थांचे दर वाढतात, कारण त्यांच्या आयातीसाठी डॉलर खर्ची पडलेला असतो. पेट्रोल-डिझेल-गॅस-रॉकेल महागले की जीवनातील इतर प्रत्येक गोष्ट महाग होते. फक्त नियोजन मंडळात मांडलेले गणित वर्षानुवर्षे छत्तीस रुपये कमावणारे श्रीमंत मोजण्यात गुंग असते. सामान्य माणूस महागाईत भरडत जात असतो. तर दुसरीकडे शंभर टक्के FDIसाठी मार्ग मोकळा होऊन परदेशी गुंतवणूकदार सर्व क्षेत्रांचा ताबा घेऊन देशाचा फसवा GDP वाढवणार असतो. (खरे तर GNP मोजायला पाहिजे – म्हणजे परकीयांनी त्यांच्या देशात नेलेला नफा वजा करून काढलेला GDP). त्याच श्रेयाबरोबर राजकीय पक्षांना ‘फॅसिलिटेटिंग डोनेशन’ मिळणार असते व प्रसंगी वैयक्तिक थैल्यादेखील. वरिष्ठ अधिकारीदेखील या चंगळीत हवे तर वाटेकरी होऊ शकतात. ‘देश म्हणजे परदेशी गुंतवणूकदार+ सत्ताकारणी पक्ष + काही वाटेकरी वरिष्ठ अधिकारी’ असे ज्यांचे गणित आहे, त्यांच्या दृष्टीने रुपयाची घसरण हे मोठया विकासाचे, खंबीर पाऊल टाकण्याचे धोरण असते – व तेच फॉर्मल अर्थशास्त्रज्ञ असतात. तेव्हा त्यांना व त्यांच्या देशाला ‘जय हो’ एवढेच म्हणणे ठीक.
leena.mehendale@gmail.com
9869039054





































Filed in: १८ ऑगस्ट २०

Sunday, August 11, 2013

दुर्गाशक्ती आणि माफियाशक्ती Aug 11, 2013 म टा

दुर्गाशक्ती आणि माफियाशक्ती

Aug 11, 2013

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/21747397.cms


लीना मेहंदळे

वाळूमाफियांच्या दंडेलीवरून दुर्गा नागपाल यांचे निलंबन झाले. पेट्रोल माफियाच्या दंडेलवरून नाशिकमध्ये यशवंत सोनावणे या उपजिल्हाधिकाऱ्याचा खून करण्यात आला. जोवर माफियांना राजकारणींचे संरक्षण मिळत राहिल तोवर ते होत राहील.


असिस्टंट कलेक्टर दर्जाची आयएएस अधिकारी दुर्गाशक्ती नागपाल हिला निलंबित करण्यात आले. आता तिच्यावर खातेनिहाय चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत. म्हणजे खातेनिहाय चौकशी झुलवत ठेवून तिचे निलंबन दीर्घकाळ चालू ठेवले जाऊ शकते जेणेकरून तिला फक्त तुटपुंजा पगार दिला जाईल बाकी कोणतीही सुविधा असणार नाही. या प्रकारे तिला जेरीला आणण्याच्या प्रयत्नांसाठी सरकार नावाच्या अशरीरी प्राण्या ची शक्ती खूप मोठी असते.
दुर्गाशक्तीच्या सेवेचे पुढे काय होईल या प्रश्नाचे उत्तर कठीण नाही. सध्याच्या चौकशीची व्याप्ती एवढी मोठी नाही की तिला नोकरीतून काढता येईल. त्यामुळे यथावकाश आठ-दहा वर्षांत कधीतरी ती नोकरीत परत येईल. यूपीमध्ये नाही आली तर केंद्र सरकारात येईल. तोपर्यंत तिचे उमेदीचे शिकण्याचे धडाधडीचे दिवस गेलेले असतील. एका वांझोट्या रागाची आच मात्र उरलेली असेल तिचा ताप इतरांना शून्य आणि तिला खूप होऊ शकतो. तो न होऊ द्यायचा असेल तर तिने एम. एन. बुच या माजी आयएएस अधिकाऱ्याकडून निलंबन काळात तोल आणि आयएएसची धडाडी कशी टिकवतात ', हे शिकून घेण्यास लगेच सुरुवात करायला हवी.

दुर्गाशक्तीच्या निलंबनावरून टीव्ही आणि वर्तमानपत्र या दोन्ही माध्यमांनी खूप चर्चा केली आहे. ही चर्चा पुढेही चालू राहील. पण यात एक गोष्ट विसरली जाते. ती ही की आपण आज १९४७मध्ये नसून २०१३मध्ये आहोत. शासकीय अधिकाऱ्यांच्या तथाकथित सुरक्षा कवचाबाबतच्या परिस्थितीत या ६५ वर्षांच्या का‍ळात खूप फरक पडला आहे.

मला अपहरण सिनेमातील नाना पाटेकरने उभ्या केलेल्या पात्राचा आमदार कम अपहरण डॉन इथे आठवतो. आपल्या कारच्या डिकीत लपवलेले शव चेक पोस्टवर पोलिसांनी तपासू नये यासाठी तो तेथील पोलिस इन्स्पेक्टरच्या थोबाडीत मारतो आणि त्याचवेळी तिथे आलेल्या त्याचाच पिता असलेल्या पोलिस कमिशनरला ऐकवतो इससे कहो की हम जनता के सेवक है और ये जनता का नौकर '. आजचे जनतेचे सेवक देखील सर्व दुर्गा नागपाल सर्व खेमकांना सर्व सूर्यवंशींना हेच सांगत आहेत की तुम्ही नौकर आहात कायदा-सुव्यवस्था टिकवणारी यंत्रणा नाही आणि आम्ही जनतेचे सेवक असल्याने तुमचे मालक-पालक-चालक आहोत.

काळात बदल

१९४७मध्ये देशाला नुकतेच स्वातंत्र्य मिळाले तेव्हा कायदा सुव्यवस्था राखणारी यंत्रणा महत्त्वाची व गरजेची आहेहे नव्याने आलेल्या राज्यकर्त्यांना उमगलेले होते. त्याही आधी चिंतामणराव देशमुखांना आयसीएसमध्ये जा आणि शासन व्यवहार शिकून घ्या ', असे सांगणाऱ्या लोकमान्य टिळकांना ते उमगलेले होते. स्वातंत्र्यानंतर गृहमंत्री झालेल्या सरदार पटेलांना उमगलेले होते व घटनाकार बाबासाहेब आंबेडकरांनाही उमगलेले होते. म्हणूनच ब्रिटिशकालीन असूनही ती प्रशासकीय यंत्रणा तशीच ठेवली गेली. त्याचप्रमाणे शिक्षण यंत्रणा स्वास्थ यंत्रणा ,सेना डाकतार रेल्वे न्यायालये या सर्व यंत्रणांही जशाच्या तशाच ठेवण्यात आल्या.

हा इतिहास पाहिल्यावर या सर्व यंत्रणा स्टेट्स को इस्ट '... आहे तसेच चालू द्या म्हणणाऱ्या का झाल्या याचे उत्तर कठीण नाही. पण त्या तशा राहायला नको होत्या. आणि हा बदल त्यांच्यामध्ये स्वयंप्रेरणेने यायला पाहिजे होता... खासकरून आयएएस या वर्गामध्ये कारण ज्यांना सर्व खात्यामंध्ये संचार आणि पोस्टिंग आहे म्हणूनच त्यांचा अनुभव व चिंतन आहे. अशी ही महत्त्वाची यंत्रणा आहे.

१९६०मध्ये जेव्हा देशात सुव्यवस्थेबरोबरच विकासाची जबाबदारी प्रशासकीय यंत्रणेवर टाकण्यात आली त्यासाठी ब्लॉक डेव्हलपमेन्ट ही नवी संकल्पना उदयाला आली. त्यावेळी प्रशासकीय भूमिकेत मोठा बदल घडला. आता त्यांना वेगाने आर्थिक विकास ', ' गरिबी हटाओ यासारख्या स्वप्नांचा पाठपुरावा करायचा होता. त्यांचे शिक्षण व मनोवृत्ती या अपेक्षित वेगासाठी अपुरी पडत होती. १९६० ते १९८० आणि १९८० ते २००० असे टप्पे पाडले तर एक स्पष्ट फरक दिसून येतो. विकासाच्या योजना नीट राबवल्या गेल्या किंवा राबवल्या न गेल्यास याचा परिणाम त्या त्या भागातील निवडणूक लढविणाऱ्या प्रतिनिधींवर पडणार होता. दुसरीकडे स्वातंत्र्यपूर्व मिळवलेला करिष्मा कमी पडून जनता आता नव्या संदर्भाने आपल्याला जोखणार याची जाणीव राजकीय नेत्यांना होऊ लागली होती.

या नव्या संदर्भासाठी विकासाचा मुद्दा पुरणार नव्हता कारण त्याची गती धिमी होती. परंतु गटागटाच्या अस्मितेवर फुंकर घालणे शक्य होते. त्याच बरोबर लोकांनी अशिक्षित अप्रगत राहण्याने त्यांची गटागटांत बांधणी करणे शक्य होते. आता स्टेट्स को '... ' राहू दे ही भूमिका राजकारण्यांची व अन्त्योदयातून विकास घडू दे ही भूमिका प्रशासनाची होती. नियमावर बोट ठेवणे प्रशासनाला शक्य होते तर त्यामुळे आमचे राजकारण मागे पडते हा रोष सत्ताधिकाऱ्यांचा होता. त्या संघर्षातून अगदी सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीशही सुटले नाहीत. हे केशवानंद भारतीच्या खटल्यातील न्यायाधीशांना मिळालेल्या वागणुकीवरून दिसून येते. देशाला कमिटेड ज्युडिशियरी हवी का असा वाद निर्माण झाला होता तेव्हा तो सुदैवाने फारसा पुढे गेला नाही. त्या वादाचा दुसरा टप्पा इथून पुढे सुरू होणार अशी चिन्हे मात्र दिसू लागली आहेत. निमित्त आहे शिक्षा झालेल्या जनप्रतिनिधीबाबत व सीबीआय स्वायत्ततेबाबत सुप्रीम कोर्टाने घेतलेली भूमिका.

तिनईकरांचे उदाहरण

महाराष्ट्रात सेक्रेटरी असलेले व सचोटीसाठी गाजलेले तिनईकर यांची बदली अंतुले यांनी तडकाफडकी नाशिकला 'ट्रायबल कमिशनर ही नवीन पोस्ट निर्माण करून केली. त्यांना उद्याच हजर व्हा ', असे आदेश मिळाले. हे ऑफिस कुठे आहे त्याचा स्टाफ किती व कुठे आहे ट्रायबल कमिशनर राहणार कुठे त्याचा पगार निघणार कसा ,त्याला निदान हजर झालो हा रिपोर्ट लिहिण्यापुरती स्टेशनरी तरी आहे का या सर्व प्रश्नांचे नकारात्मक उत्तर होते. या बदलीच्या वेळी महाराष्ट्रातील अधिकारी प्रतिक्रिया म्हणून किंवा केस स्टडी म्हणूनही एकत्र येऊन चर्चा करू शकले नाहीत. धोका ओळखू शकले नाहीत. समाजात किंवा अकादमींच्या इंटलेक्चुअल जगात किंवा मीडियामध्येही धोका ओळखणे व धोका टाळण्याची उपाययोजना करणे हे झाले नाही. अंतुले यांनी तर त्यानंतर महाराष्ट्रात आयएएस अधिकारीच नकोत असे लेखी पत्र यूपीएसीला व केंद्र सरकारला देऊन टाकले. नंतर तडजोड म्हणून चार दोन तीन इतक्याच नव्या
बॅचच्या अधिकाऱ्यांचा स्वीकार केला.

राजकारणी लोकांनी आपण पुन्हा पुन्हा निवडून येण्याची काळजी केली हे स्वाभाविकच होते. त्यात धोका कुठे होतातर त्यासाठी सुरू झालेल्या उपाययोजनांमध्ये होता. गटबाजी टिकवणे भाग होते. त्यासाठी आपल्या गटातील लोकांना विकासाच्या योजनांचे फायदे मिळालेच पाहिजेत याबरोबरच इतर गटांना ते मिळता कामा नयेत हा आग्रह सुरू होत होता. त्यातून योग्य व्यक्तीला न्याय द्या अशी भूमिका घेणारे अधिकारी डोळ्यांत खुपू लागले. तिनईकर अरविंद इमानदार हे महाराष्ट्रातील अधिकारी तसेच बुच शर्मा हे मध्य प्रदेशातील. जवळ जवळ प्रत्येक राज्यात हे होत होते. जे प्रतिनिधी दोन किंवा अधिक वेळा निवडून आले त्यांच्या घराण्यांत लगेचच राजकारण स्थिरावत गेले व दुसरी पिढी अधिक आक्रमक होती. शिवाय शिकलेलीही होती. त्यामुळे विकासाची कामे करवून घेण्यासाठी ज्या खासगी संस्थांची वारंवार मदत घ्यावी लागत होती ती सर्व क्षेत्रे काबीज करणे त्यांना गरजेचे होते आणि शक्यही होते. त्यातूनच सरकारी ठेका घेणे (किंवा त्यात वाटा घेणे) शहरी भागांमध्ये झोपडपट्टी व अनधिकृत बांधकामांना प्रोत्साहन देऊन व्होट बँक स्थापन करणे शिक्षणाचा धंदा जाती जमातीतून तेढ व संघर्ष वाढवणे ,एखाद्या जाती जमातीला अस्मितेच्या नावाने आक्रमक बनविणे या सर्व बुद्धिबळातील चाली होत्या. त्याचबरोबर निवडणूक काळात प्रत्येक मतदाराला पैसे दारू वस्तू यांचे अमिष दाखवणे गरजेचे होते. त्यासाठी पैसा हवा. दुसरीकडे खनिज संपत्ती वने जमीन पेट्रोलियम एजन्सी या सारखी लूट करण्याची नवी नवी क्षितिजे आवाक्यांत येत होती. पण प्रत्येक ठिकाणी अडसर होता तो मात्र प्रशासकीय अधिकाऱ्यांचाच.

अधिकाऱ्यांची वर्गवारी

प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्येही तीन गट पडले. उघडउघड पैसा कमावणारा गट स्वतःवर काही जबाबदारी न घेता मिळतेजुळते घेऊन टिकून राहणारा गट आणि कधीतरी पोटतिडकीने काहीतरी चांगले करू बघणारा गट. यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांची बाजू न घेणारी लोकसंख्याही आपल्याला मोठ्या प्रमाणावर दिसते दुर्गाच्या केसेमध्ये पुन्हा एकदा दिसली. घराणेशाही सार्वजनिक संपत्तीची लूट समाजात गटबाजी व तेढ हे तीन धोके आहेत का ?समाजाला तसे प्रकर्षाने वाटते का ते व्यक्त होऊ शकेल का त्यातून ज्यांच्या पदरांना काही लाभ पडत आहे ,त्यांना यातून परावृत्त करणे शक्य आहे का मुळांत त्यांची संख्या खूप मोठी आहे आणि त्यांना त्यात काहीही चूक दिसत नाही. असे असूनही या सर्वांवर भविष्यातील धोका ', असे लेबल लावणे व त्याचे शेवटपर्यंत समर्थन करू शकणे हे शक्य होणार का तेही एकट्या अधिकाऱ्याला 

वाळू माफियांच्या दंडेलीवरून दुर्गाचे निलंबन इत्यादी झाले. पेट्रोल माफियाच्या दंडेलवरून नाशकात यशवंत सोनावणे या उपजिल्हाधिकाऱ्याचा खून करण्यात आला. वाळू उपसा करून नद्यांचे नैसर्गिक संरक्षक आवरण नष्ट होत आहे नद्या उजाड होत आहेत. पुणे सातारा बेंगळुरू हिमाचल प्रदेश येथील डोंगरचे डोंगर कापून काढून पर्यावणारला आवाहन केले जात आहे. हे सर्व माफियांकडून व त्यांच्या राजकारणी संरक्षकांकडून होत आहे. पण हा धोका आहे का हे ठरविताना थैल्या वरचढ होत आहेत तोपर्यंत दुर्गा सारख्या घटना होतच राहणार.